Sunday, June 23, 2019

सहा सोनेरी पाने (पुस्तक तिसरे)


स्वातंत्र्यवीरांच्या मौक्तिकांमधले सगळ्यात महत्त्वाचे एक. आठवी नववी व दहावी ह्या इयत्तेत असताना हे वाचले. त्या वेळी डोंबिवली नगरपालिकेचे वाचनालय खूप छान व चांगली पुस्तके असणारे चांगले ठेवलेले वाचनालय होते. आता कसे आहे माहीत नाही.
पहिल्यांदा हे पुस्तक तेथून वाचले व मग एका पुस्तक प्रदर्शनात विकत घेतले. माझी जन्म ठेप, काळेपणी कादंबरीतला डोलकाठी अजून आठवतो. पण आपल्या राष्ट्राचा अलौकिक इतिहास कधी मॅकॉलेच्या शिक्षणात समजलाच नाव्हता तो समजला.
माझ्या जीवनावर त्याचा खूप प्रभाव आहे. सहा सोनेरी पाने जो पर्यंत आपण वाचत नाही तो पर्यंत आपल्याला आपला इतिहास फक्त पराभवाचा आहे असेच वाटत राहते. आपल्या धर्मातील सात दोष (बंदी) व त्या मुळे झालेली हानी लक्षात येते.
मी हे who are we असे हल्लीच्या घाल माती काढ गणपती छाप पिढीसाठी सोनेरी पानांवरून लिहिले आहे. जरूर वाचावे