Wednesday, July 23, 2014

विचा-यांचा अविचार


 
ठाण्याच्या खासदारांनी, महाराष्ट्र सदनात जेवण चांगले नाही मिळाले म्हणून तेथल्या सुपरीटेंडंटच्या तोंडात बळेने पोळी कोंबल्याचे दृष्य सर्वानीच पाहीले असेल. जेवण चांगले नाही म्हणून राग आलेल्या ठाण्याच्या राजन विचा-यांनी जे कृत्य केले ते निंदनीय आहेच पण त्यावर त्यांचा बचावाचा प्रयत्न अजूनच निंदनीय आहे.
त्या केटररची किंवा त्या सुपरीटेंडंटची कितीही चूक असली तरी कोणाच्या तोंडात कोंबणे म्हणजे व्यक्ति स्वातंत्र्यावर कु-हाड मारण्यासारखे आहे. आपण खासदार आहात, प्रशासनिक कारवाई घेण्याचा अधिकार आपण बाळगता, मग तो सोडून हा अविचार म्हणजे तुमचा खासदारकीचा निव्वळ मगरुरपणाच दाखवतो.
आपण काय विचार करतो ह्या पेक्षा आपण काय कृती करतो ह्यावरच समाजातली आपली प्रतिमा बांधली जाते. लोकसंग्रह करण्या-यांनी तरी हे मनात बाळगून आपली कृती केली पाहिजे. जे राजन विचा-यांनी केले नाही. कोणाला समज द्यायचीच असेल तर असे तोंडात कोंबून कोणाचा वैयक्तिक अपमान करायचे स्वातंत्र्य तर कोणालाही नाही.
ह्या परिस्थितीत राजन विचा-यांनी त्या सुपरिटेंडंची सार्वजनिक माफी मागणे हेच उचित आहे. तसेच राजकीय पक्षांकडून ह्या गोष्टीला हिंदू मुसलमान रंग देण्याची चूक झाली नाही पाहिजे.
 

Sunday, July 20, 2014

बुकर पाहीतोषिक मिळवणा-या बाईंनी केला गांधींचा अपमान


काहीच दिवसांपूर्वी महात्मा अय्यनकालीह्यांच्या जीवनावर बोलताना अरुंधती रॉय ह्यांनी महात्मा गांधींना वर्णद्वेशी म्हटले. त्या पुढे म्हणाल्या It is part of a political conspiracy to perpetuate the caste system that such heroes are never celebrated. All the while, the nation has been fed on centuries of lies about “mahatmas,” who never openly renounced the caste system but instead, advocated that the hereditary occupation of people who belonged to a particular caste ought to be the maintained social order. The story of Gandhi that we have been told, is a lie. It is time to unveil a few truths, about a person whose doctrine of nonviolence was based on the acceptance of a most brutal social hierarchy ever known, the caste system. Gandhi believed that a scavenger should always remain a scavenger. Do we really need to name our universities after him?”

गांधी, सावरकर, फूले, आय्यनकलीह्या सगळ्या महात्म्यांनी छूत अछूत व वर्णद्वेशा विरुद्ध केवढे मोठे काम केले होते ते सर्व परिचितच आहे. पण ह्या सगळ्याला बगल देऊन फक्त प्रसिद्धीसाठी अरूंधती बाईनी जो महात्मा गांधींचा अपमान केला तो निंदनीय आहे.

 

अरूंधती बाईंना देशद्रोही वक्तव्य देण्याची जणूकाही सवयच आहे. एवढे काय कमी होते, आता राष्ट्रपित्याचा अपमान करुन प्रसिद्धी माध्यमात राहण्याचा प्रयत्न चालू आहे. दूस-यांना नावे ठेवून स्वतः वर्तमान पत्रातून बातमी बनून राहायचे हे केजरीवाल, अरूंधती बाई ह्यांना सहजच जमते.

 

आपले मत ठेवण्याचा अधीकार सगळ्यांना आहे, पण ह्या थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या आपला देश स्वतंत्र होण्यासाठी दिलेले योगदान विसरून चालणार नाही. बूकर पारितोषिक मिळाले म्हणून कोणालाही काहीही म्हणायचे स्वातंत्र्य मिळाले असे वाटायला नको.