Monday, August 24, 2020

महाभारत (पुस्तक सहावे)

महाभारत - प्रा. द गो दसनूरकर लिखित आपले महाभारत. १० भाग आहेत. महाभारताचे रोज वाचन व्हायचे आमच्याकडे. महाभारत काव्य काय आहे व त्यातली मुख्य व्यक्तिमत्त्व कोण कोणती आहेत हे नंतर सु ग शेवड्यांच्या व्याख्यान मालेत ऐकायला मिळाले. ते गणपती मंदिरात महाभारतातली सहा पात्रांवर प्रवचने घ्यायचे. “शाळे बाहेरच्या शाळा” हा लेख गणेश मंदिराची आठवण म्हणून लिहिला. 

शाळे बाहेरच्या शाळा

महाभारतातल्या कथा ऐकायला व वाचायला मजा वाटायची. महाभारतातल्या गोष्टी म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात येणारे प्रसंग आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वनवास, अज्ञातवास, हे करावे का ते करावे ह्याचे द्वंद्व, हे सगळे येत असते. महाभारत हे १० भागांचे मोठे पुस्तक प्रथमच वाचले. मी तेव्हा नववी दहावीत असेन. महाभारतात गोष्टी असल्या तरी दसनूरकरांनी त्यावर भाष्य केले आहे ते फार सुंदर व सूचक आहे. मी मोकळ्या तासाला वर्गात त्यातल्या गोष्टी सांगायचो. 

त्या वेळेला कळले की महाभारत हा खरा “जय” नामक इतिहास आहे. आपल्याकडे इतिहास लिहायची पूर्वी पद्धत नसायची. काय जो इतिहास आहे तो पुराणात लिहिला गेला आहे. परत आपली संस्कृती बरीच जुनी असल्यामुळे बऱ्याच वेळेला इतिहास व पौराणिक कथा ह्या मध्ये संभ्रम निर्माण होतो. व जे जे गौरवास्पद आहे ते ते पौराणिक आहे व जे जे पराभवाचे दाखले आहेत तोच फक्त इतिहास आहे असे ह्या मॅकॉलेच्या नातलगांनी आपल्या मनात ठोस बसवलेले आहे. रामाचा जन्म अयोध्येला झाला ही ऐतिहासिक घटना नसून फक्त पौराणिक कथा आहे व ती पौराणिक आहे म्हणून ती खरी नाही व ती खरी नाही पण बाबराची मशीद तिथे उभी आहे म्हणजे तीच खरी व ती खरी म्हणून तेथे राम मंदिर का उभारायचे असे प्रश्न विचारण्यात मोठी संख्या हिंदू लोकांचीच. ह्या वर एक लेख लिहिला होता तो आठवला. जाता जाता देतो. लेख इंग्रजी मध्ये आहे - Making Peace with History.

MAKING PEACE WITH HISTORY

ह्या पुस्तकाचे मुखपृष्ठ पुण्याला घरी आहे. येथे नाही देता येत.

No comments:

Post a Comment