Sunday, August 12, 2012

पेटलेले आसाम


गेले एक महिना आसाम पेटलेले आहे. भडकलेल्या दंग्यात शेकडो मरण पावले आहेत. हजारोंना दुखापत झाली आहे तर लाखो बेघर झाले आहेत. ह्या दंग्यांमागे कोण आहे ते सर्वांना माहीत आहे. घुसखोर बांगलादेशी मुसलमान लाखोंच्या संख्येने आज आसाम मध्ये वसलेले आहेत. मत पेट्यांच्या ह्या राजनीतीत त्या घुसखोर बांगलादेशी मुसलमानांना रेशनकार्ड व व्होटर आयडी कार्ड पण मिळाली आहेत. ह्या घुसखोरांनी आसामाचे बोडो व आसामी लोकांचे जिणे मुश्कील करून टाकले आहे. त्यांना धाक दाखवून दहशत माजवून सळोकापळो करून सोडले आहे. जर हे थैमान असेच चालू राहू दिले तर थोड्याच दिवसात काश्मिरात जसा काश्मिरी पंडितांचा प्रश्न सुरू झाला तसा येथे पण व्हायला वेळ लागणार नाही. काश्मिरी पंडितांसारखे इथल्या लोकांना त्यांचे राज्य सोडून पळून जावे लागणार. 



मुंबईत ज्या रितीने राझा ऍकॅडमी तर्फे घुसखोरांना पाठिंबा दाखवण्यात येत आहे त्या वरून आपल्या लोकांनी ता वरून ताकभात ओळखावे.



वृत्तसंस्थांनी सुद्धा ह्या घुसखोरांबद्दल व आसामात होणाऱ्या दंग्यांबद्दल वस्तुनिष्ठ राहून बातम्या दिल्या पाहिजे. ह्या पार्श्वभूमीवर तिस्ता सेतलवाड, अरुंधती रॉय व मानव हक्क संघटनांना मला असे विचारावेसे वाटते की आता मूग गिळून का बसला आहात? गुजरात मध्ये तर आपण फार आग पाखडत आहात, मग येथे काय झाले. का बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध न बोलण्याचा कोणाच्या बरोबर करार झाला आहे?




Friday, August 10, 2012

पालथ्या घड्यावर पाणी

अण्णा हजारे ह्यांनी त्यांची टीम मोडकळीस काढली. आता नव्या पक्षाच्या स्थापनेचे काम सुरू केले आहे. सगळ्या राजकीय पक्षांचे ध्येय व उद्दिष्ट चांगलेच असते. प्रत्येक पक्ष राष्ट्र बांधणी करताच जन्म घेतो. राष्ट्रबांधणी, करता येण्यासाठी पक्षाला सत्तेवर यावे लागते. सत्तेवर येण्यासाठी बरीच कसरत करावी लागते. इथे लोकनेत्यांपेक्षा निवडून येण्याची क्लुप्ती लढवणारे व्यवस्थापक पाहिजेत. हे सगळे करण्यात राजकीय पक्षाचा मूळ हेतू हरवला जातो, व राजकीय पक्षाकडे मग येन केन मार्गाने आलेली सत्ता टिकवून ठेवायची एवढेच काय ते उद्दिष्ट राहते. सत्ता भल्याभल्यांना भ्रष्ट करते.



हे होऊ न देण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने लोकसंग्रह करणारा, जनतेला आवडणारा असा लोकनेता पाहिजे. असा लोकनेता, पुरोगामी विचारांचा, भारताचा सर्वांगीण विकासाची स्वप्न बघणारा व जनमानसावर प्रभाव पाडणारा असला पाहिजे. आपल्या प्रभावाने भारतीय जनतेच्या विचारांची चौकट आमूलाग्र बदलून, आपले राष्ट्र बलाढ्य, समृद्ध व कल्याणकारी करण्याच्या आचार विचारांवर ती चौकट बसवली पाहिजे. हे राष्ट्रबांधणीचे कार्य हा भारतीय जनतेचा राष्ट्रधर्म झाला पाहिजे असा इथल्या जनतेचा स्वभाव बनला पाहिजे. आपल्या उदाहरणाने असे राष्ट्रव्रत घ्यायला लावणाऱ्या लोकनेत्याची आपल्याला आज गरज आहे. असा करिश्मा असणारा नेता आपल्याला पाहिजे आहे. अण्णा हजारे खचितच असे नेते नाहीत. उलट एक नवा पक्ष काढून अण्णा, मते फोडायचे काम मात्र करत आहेत. मतं फुटल्याने, अस्थिर सरकार बनायचा योग जास्त व अस्थिर सरकार, दुर्बल असल्या कारणामुळे भ्रष्टाचार आणखीनच भडकायला मदत करते. जर त्यांचा लढा भ्रष्टाचारा विरुद्ध असेल तर त्यांनी त्यातल्या त्यात कमी भ्रष्टाचारी पक्षाला आपला पाठिंबा जाहीर करायला पाहिजे. किंवा ते नाही तर निदान समविचारी पक्षांमध्ये समन्वय साधायला पाहिजे. नवा पक्ष काढल्यावर निवडून येण्यासाठी ज्या खस्ता खाव्या लागतात त्या लागतीलच, एवढे करुन येणाऱ्या २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकांत ते सत्तेवर येऊ शकणार नाहीतच. त्यांच्या जवळ अगदी नगण्य खासदार असतील व इतक्या कमी संख्येने ते लोकपाल विधेयक पारित करण्यासाठी कोणावर जोर आणू शकणार नाहीत. मग अशा परिस्थितीत जर तकलादू लोकपाल विधेयक पारित झाले तर ह्याला अण्णा हजारेच जबाबदार ठरतील.



अण्णा हजारेंनी राजकीय पक्ष काढायचा ठरवून आता पर्यंत केलेल्या कामावर पाणी फेरले आहे.